तुळजापूर ची तुळजाभवानी हि महाराष्ट्र तसेच गुजरात तेलंगणा आंध्रप्रदेश व कर्नाटक मधील असंख्या कुटुंबाची कुलस्वामिनी आहे. वर्षभरातून लाखो भाविक तुळजापूर ला भेट देतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी देवीचे भक्त होते. [tuljabhavani yajna mandap]
यज्ञ म्हणजे “भक्ती, पूजा, बलिदान आणि नैवेद्य” श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर मध्ये येत असताना आपण महाद्वारामधून प्रवेश करून काहीश्या पायऱ्या उतरून आल्यानंतर आपल्याला कल्लोळ तीर्थ दिसते तिथे पवित्र होऊन मंदिराच्या दिशेने आल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ मंडप आहे. यज्ञ मंडपाचे शिखर सोन्याचे असून शिखरावर पहिले असता १२ तुळजाभवानी देवीचे रूपे आपल्याला पाहावयास मिळतात.
यज्ञामध्ये अजाबळी का दिला जातो?
देवीला पुरण पोळी नैवेद्य दाखवला जातो. तसेच प्रथे प्रमाणे देवीस दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. हे सर्व नैवेद्य दाखवल्यानंतर देवीस मांसाहाराचा नैवेद्य (खारा नैवेद्य) दाखवतात.
महिषासुर नावाचा एक राक्षस होता. हा देवी देवतांना त्रास देत असत. तेव्हा सगळे देव एकत्र येऊन आणि त्यांनी ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्या कडे या राक्षसांपासून वाचण्यासाठी अति प्रचंड तपश्चर्या केली . आणि या प्रचंड तेजा रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली.

[Tuljabhavani Temple Yajna Mandap]
महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता. तेव्हा तो देवीला शरण जाऊन म्हणाला माझे गर्व हरण झालाय असं म्हणून त्याने आपल्या दोन इच्छा तुळजाभवानी देवीस मागितल्या यात पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतले जावे आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला आवडतो तो मांसाहार चा नैवेद्य दाखवला जावा. तुळजा भवानी देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणून पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचे नाव हे “महिषासुर-मर्दिनी” असे घेतला जातं. आणि दुसऱ्या इच्छे प्रमाणे देवीच्या उजव्या पायाशी असणाऱ्या महिषासूरास (दैत्यास) मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो आणि यामुळेच तुळजाभवानी मंदिरामध्ये आजा बळी (बकरा बलिदान) देण्याची परंपरा आहे.